संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा   

काँग्रेसची केंद्र सरकारकडे मागणी 

नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करण्यासाठी संसदेचे विशेश अधिवेशन आणि  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व पक्षीय बैठक बोलावावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. 
 
सवर्ं पक्षीय बैठकीत कारवाईची माहिती नेत्यांना दिली जावी, तसेच कारवाईवर चर्चा घडवून आणण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी काँग्रेसने केली. सैन्य कारवाई आवरती का घेतली आणि शस्त्रसंधी का केली ? याची माहिती मिळावी, हा त्या मागचा हेतू आहे, असे काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी म्हटले आहे. शस्त्रसंधीची घोषणा भारत आणि पाकिस्तान यांनी करण्याऐवजी अमेरिकेतून का करण्यात आली ? यावर देखील चर्चा व्हावी, अशी अपेक्षा रमेश यांनी एक्सवर टाकलेल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे. 
 
 भारत आणि पाकिस्तान यांच्यात निष्पक्ष चर्चा करण्यासाठी अमेरिका तयार आहे असे अमेरिकेचे गृहसचिव मार्क रुबियो यांनी म्हटले होतेे. त्यावर प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सरकारने सीमला करार बाजुला ठेवला आहे का ? आणि तिसर्‍या पक्षाची मध्यस्थी स्वीकारली आहे का ? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. 
 

Related Articles